History, asked by tawareashok6, 3 months ago

द्रविड व नगर या दोन शैलींच्या मिश्र शैलीला.........असे म्हणतात.​

Answers

Answered by Anonymous
0

द्रविड (द्राविड) संस्कृति : भारतातील एक संस्कृती. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत द्रविडांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीची संमिश्र वाढ मुख्यत्वेकरून आर्य आणि द्रविड यांमधील संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमुळे झाली, हे आता सर्वमान्य झाले आहे.

द्रविड संस्कृतीचे अभ्यासक, द्रविड हे कोण होते आणि त्यांचा भारताशी संबंध कसा आला, ह्याचा प्रथम विचार करतात. द्रविडांचे मूलस्थान, त्यांचा वांशिक एकजिनसीपणा आणि त्यांचे भारतात झालेले आगमन ह्यांबद्दल विविध मते मांडली जातात. सध्याची भारतातील लोकवस्ती पाहता द्रविड वंशाचे व संस्कृतीचे लोक दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने सापडतात. असे असेल, तरी ते तेथे कसे आले व कोठून आले यांबद्दल मात्र निर्णायक मत कोणीच देऊ शकत नाही, काही भाषाशास्त्रज्ञ तर द्रविड हा भाषासमूह आहे. मानववंश नाही, असे मत मांडतात. द्रविड वंश हा भारतातील सर्वांत सुसंस्कृत प्राचीन मानववंश आहे, असे एक मत मांडले जाते. काहींच्या मते द्रविड हे एकसंघ नसून त्यांच्या दोन शाखा होत्या. तमिळ बोलणारे आणि मुंडारीसारख्या भाषा बोलणारे कोलेरियन ह्या द्रविड वंशाच्या दोन शाखा पूर्वी मानल्या जात परंतु आता हे मत ग्राह्य धरण्यात येत नाही. काहींच्या मते द्रविड वंशाचे लोक ऑस्ट्रेलियातील आदिवासींशी संलग्न असले पाहिजेत, तर काहींच्या मते वर उल्लेखिल्याप्रमाणे ते मूळचेच भारतीय असावेत. सर्वसाधारणपणे द्रविड वंशीय लोक कमी उंचीचे, काळ्या वर्णाचे, काळ्या डोळ्याचे, लांबट डोक्याचे, रुंद नाकाचे, जाड ओठांचे, कुरळ्या केसांचे असे मानले जातात. परंतु शतकानुशतके चाललेल्या वंशसंमिश्रणाच्या प्रक्रियेत द्रविडांची अथवा आर्यांची शारीर, वांशिक अथवा सांस्कृतिक वैशिष्ट्ये अबाधित व अविकृत राहिली असतील, असे मानणे योग्य ठरणार नाही.

काहींच्या मते दक्षिण भारतामध्ये जे नवाश्मयुगीन संस्कृतीचे लोक होते, त्यांचे वंशज म्हणजे द्रविड होत. द्रविड लोक भारताबाहेरून येऊन भारतात स्थायिक झाले सिंधू संस्कृतीचे लोक द्रविड असावेत द्रविड भूमघ्य समुद्राच्या पूर्वेकडील भागातून अथवा पश्चिम आशियातून येऊन दक्षिण भारतात स्थायिक झाले महाश्मयुगीन संस्कृतीशी त्यांचा संबंध होता, अशी विविध मते नमूद केलेली आढळतात. इतर काही द्रविड हे आर्यपूर्व भारताचे मूळचे रहिवासी असल्याचे मत मांडतात. याचा पुरावा म्हणून वैदिक संस्कृतीवरही द्रविड भाषांचा परिणाम झाल्याची उदाहरणे दाखवतात. कॉल्डवेलच्या मते द्रविड हे तुरानियन वंशाचे असून ते दुसरीकडून भारतात आले. या सर्व मतांतून कोणतेही एक मत निर्णायक म्हणून ग्राह्य धरणे सोपे नाही. द्रविड संस्कृतीची प्राचीनता, द्रविड भाषांची वैशिष्ट्ये आणि द्रविडांची वांशिक वैशिष्ट्ये ह्यांबद्दल आता फारसे दुमत नाही. काही वर्षांपूर्वी द्रविड संस्कृतीचे मूल्यमापन यथार्थपणे झालेले नव्हते. भारतीय संस्कृतीत जे जे उत्कृष्ट, ते ते सर्व आर्य संस्कृतीचे असे मानण्याकडे कल होता. आता हे मत ऐतिहासिक दृष्ट्या, भाषाशास्त्रीय दृष्ट्या, तद्वतच वंशशुद्धतेच्या दृष्टीने अग्राह्य ठरले आहे.

भारतामध्ये चार मुख्य भाषिक वंश मानण्यात येतात आणि त्यांतील द्रविड भाषावंश महत्त्वाचा मानला जातो. या भाषेच्या वंशाचे लोक मुख्यत्वेकरून दक्षिण भारतात आढळतात. परंतु भारतीय जीवनाचा शेती हा पाया असल्याने अशा प्रकारच्या परंपरागत आणि मूलभूत आर्थिक जीवनामध्ये निरनिराळ्या मानवी वंशांचा व जातिजमातींचा संकर व्हावा, यात अस्वाभाविक काहीच नाही. असे असूनही दख्खन आणि दक्षिण भारतामध्ये द्रविड भाषागट प्रामुख्याने आढळून येतो. द्रवि़डांची प्राचीन भाषा जरी तमिळ आहे, तरी कन्नड, मल्याळम्, तेलुगू त्याचप्रमाणे कुई–गोंडी, कुई आणि ओराडम हेही द्रविड भाषेचे आविष्कार मानले जातात. त्याचप्रमाणे मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतातही द्रविड भाषा–संस्कृतीचे काही छोटे छोटे गट आढळून येतात, असे भाषाभिज्ञांचे मत आहे. बलुचिस्तानातील ब्राहुई भाषा गट हा द्रविड भाषेचाच एक आविष्कार मानला जातो. या दृष्टीने पाहता द्रविड भाषा व संस्कृती प्राचीन काळी भारतात बऱ्याच मोठ्या प्रदेशात प्रचलित होती, असे मानण्यास पुरावा मिळतो. याशिवाय उत्तर भारतातील अनेक स्थलनामांतून अवशिष्ट स्वरूपात दिसून येणाऱ्यात द्रविड भाषिक संज्ञा, वैदिक वाङ्‌मयामध्ये उल्लेखिलेल्या अनेक अनार्य जमाती, खुद्द वैदिक संस्कृतीतही आढळून येणारे द्रविड भाषिक धागे, हिंदू धर्माच्या कर्मकांड, विचार, आचार व दैवतशास्त्र यांत आढळून येणारा द्रविड संस्कृतीचा प्रभाव ह्यांवरून आर्यपूर्व काळातही ही संस्कृती भारतात स्थिर, प्रभावी व विस्तृत स्वरूपात होती असे दिसते.

आर्यपूर्वकाळातील द्रविड संस्कृतीचे स्वरूप सर्व भारतभर एक जिनसी होते किंवा काय, याची पूर्ण कल्पना करता येत नाही. सिंधू संस्कृतीमध्ये द्रविड संस्कृतीचे प्रतिबिंब काही बाबतींत पहावयास मिळते असे मानले, तर मात्र इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकामध्ये द्रविड संस्कृती ही पूर्णतया नागरी संस्कृती होती, असेच मानावे लागेल परंतु याबाबत मतभेद आहेत व या रहस्याचा उलगडा सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवर आढळून येणाऱ्या लिपीच्या वाचनानंतरच होऊ शकेल. ह्या संबंधात फादर हेरास ह्यांनी मांडलेल्या मताचा उल्लेख करणे इष्ट ठरेल. त्यांच्या मते सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवरील लिपी हे तमिळचे प्राचीन स्वरूप होय परंतु हे मत अद्याप फारसे ग्राह्य मानण्यात येत नाही. याउलट, सिंधू संस्कृतीच्या लिपीपासूनच ब्राह्मीचा उगम झाला, असे मत मांडणारेही काही तज्ञ आहेत. सिंधू संस्कृती जर द्रविड संस्कृतीचे प्राचीन रूप मानले, तर हे रूप पुरंदर इंद्राच्या आधिपत्याखाली भारतात येणाऱ्या आर्यांनी विरूप केले, असे काहीचे मत विचारात घेणे अवश्य ठरते. भारतात शिरणाऱ्या आर्यांना त्यांच्या आधीपासून भारतात राहणाऱ्या दास, दस्यू व निषाद ह्यांचे अस्तित्व प्रत्ययास आले असले पाहिजे. दास, दस्यू हे केवळ भारतातच होते असे नाही, तर ते पूर्व इराण, अफगाणिस्तान, वायव्य व पश्चिम भारत, आणि संभवतः गंगेचे खोरे इतक्या विस्तृत प्रदेशांत विखुरले असावेत.

Similar questions