India Languages, asked by sejalnaik2002, 1 month ago

दलित कथेची कोणतीही पाच वैशिष्ट्ये?​

Answers

Answered by krishankewal577222
1

Answer:

दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती.[१] स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूलाधार आहेत.[ संदर्भ हवा ]

हिंदु समाज व्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. त्अयामुळे उच्माच जात व कनिष्नुठ जात अशी विषमता असून 'दलितत्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनविले आहे. त्यामुळे दलित लेखकांची जबाबदारी या विषमतेविरुद्लेध लेखन करून लढा देणे ही आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. ही जबाबदारी स्पष्ट करताना अण्णा भाऊ साठे , "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे' असे यांनी सांगितले आहे.[ संदर्भ हवा ]

शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलितकथा लिहून त्यांनी मोलाचे काम केले आहे.

hope it helps marks me as brainliest!!!!!!!

Similar questions