India Languages, asked by jvpalmadiaz641, 2 months ago

Tumchya तुमच्या परीसरात साथीचे रोग पसरल्याने आरोग्य तपासणी व्विनाती
पत्र

Answers

Answered by rajankarkalpana
4

Answer:

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवणे तसेच या काळात अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष आणि शीघ्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी काही प्रमाणात जिल्ह्यात साथीच्या रोगाने थैमान घातल्यानंतर आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग डोके वर काढतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्यावतीने २४ तास हेल्पलाइन आणि शीघ्र पथक स्थापन करण्यात आले आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. रोगराईवर प्रतिबंध आणण्यासाठी साथ प्रतिबंधात्मक औषध कीट सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

यंदा पावळ्याच्या काही दिवस आधीच ग्रामपंचायत विभाग आणि आरोग्य विभागाने तयारी सुरू केली होती. गावांमध्ये टीसीएलचा पुरवठा करणे, नळगळती असल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करून घेणे, पाणी शुद्धिकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत घराघरांमध्ये मेडिक्लोरचे वाटप करण्यात येत आहे, काविळीसारखे आजार विषाणूजन्य असल्यामुळे पाणी उकळून थंड करून पिण्याबाबत आवाहन केले जात आहे. याशिवाय खासगी नळ कनेक्शन गटाराखालून जात असल्यास त्याची गळती नसल्याची पाहणी करून दुरुस्ती केली जात आहे. गावात जनावरे मृत पावली असल्यास त्यांची योग्य विल्हेवाट लावणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने नियमितपणे तपासणीसाठी पाठवणे, एखाद्या गावात दूषित पाणी असल्याचा अहवाल आल्यास त्या गावातील पाणीपुरवठा बंद करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, घनकचरा तसेच सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे.

पावसाळ्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष, शीघ्रपथक, गावांना भेटी देणे, पाण्याचे नमुने घेणे, आरोग्यकेंद्रांमध्ये औषध पुरवठा या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

मनीष रेंघे,आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

Similar questions