उदास शेतकरी, विहीर,पणहि़ण पाने वैचारिक लेखन
Answers
Answer:
I can't understand your question
please mark as brainlist and follow me
Answer:
धडक सिंचन विहिरी
प्रस्तावना
उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान दरवर्षी समाधानकारक राहते. परंतू अनियमित व खंडित पावसामुळे आणि सिंचनाच्या योग्य सोई-सुविधा उपलब्ध नसल्याने शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होवून शेतमालाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य शासनाच्यावतीने 11 हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम दिनांक 11 सप्टेंबर 2016 पासून हाती घेतला आहे.
सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना विहिरी मंजूरीच्या दोन किंवा अधिक वर्ष चालणाऱ्या प्रक्रियेला तडा देवून ऑनलाईन अर्ज प्राप्त करणे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ) या तत्त्वाला धरून मंजूरी देण्यात येते. शासनाच्यावतीने धडक सिंचन योजना दीड एकरापेक्षा अधिक शेत जमीन असणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी खुली आहे. यामुळेच 11 हजार विहिरींच्या लक्षांकाच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होवून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेनुसार ठराविक कालावधीत विहीर मंजुरीची प्रक्रिया दोन महिन्यात पार पाडण्यात आली आणि डिसेंबर 2016 अखेर बहुतांश विहिरींची कामे सुरू करण्यात आली. याचीच फलश्रृती म्हणून जून 2017 अखेर अवघ्या सहा महिन्यात यापैकी 5 हजार 790 विहीरींना पुरेसे पाणी लागून या विहीरी पूर्णत्वास आल्या आहेत.
सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेत लाभार्थ्यांला स्वत:च्या इच्छेनुसार, कंत्राटदाराकडून किंवा स्वत: विहीरीचे काम करायचे आहे. यामुळे अनुदानाकरिता लाभार्थ्यांला पंचायत समितीच्या फेऱ्या मारण्याची गरज राहिली नाही. संबंधित जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंताद्वारे मोजमाप झाले की, देयक पंचायत समितीस पाठविण्यात येते. पंचायत समितीद्वारे लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये झालेल्या कामाच्या मूल्यांकनाची थेट रक्कम जमा होते.