India Languages, asked by nm7233608, 1 month ago

वाचा.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला
कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे
किती अनंत प्रकार असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी' अशी
म्हण बनवायला हरकत नाही. 'मोकळा संवाद' असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित
मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा
मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला
एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या
गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही
अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण
शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे
धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.​

Answers

Answered by adiranair786
17

Explanation:

सारांश:

सर्वसामान्य माणसांना शब्दांवाचून संवाद करणे शक्य होत नाही. व्यक्तिपरत्वे बोलण्याचे अनंत प्रकार पडतात. समाजात वावरत असताना आपल्या संवादावर अनेक बंधने येतात. त्यामुळे, खऱ्या अर्थाने मोकळा संवाद होतोच असे नाही. मित्रमंडळींशी गप्पा मारतानादेखील आपण मोकळेपणे न बोलता शब्दांचा जपून वापर करतो. नात्यातल्या जविळकीमुळेच मित्रांचे स्वभाव ठाऊक असतात. त्यांचे मन जपण्यासाठी त्यांना न रुचणारे विषय टाळून त्यांना भावणाऱ्या विषयांवरच संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागतो.

Similar questions