वीज बंद पड़ली तर निबंध मराठी
Answers
Answer:
Divya Marathi
वीज गेली तर नुकसानभरपाई
वीज गेली, फ्यूज उडाला तर बहुतांश नागरिक क्रॉम्प्टन किंवा महावितरण कंपनीकडे तक्रार करतात.

Divya MarathiMay 23, 2013, 10:01 IST
GPlus

जळगाव - वीज गेली, फ्यूज उडाला तर बहुतांश नागरिक क्रॉम्प्टन किंवा महावितरण कंपनीकडे तक्रार करतात. काही वेळाने वीज आल्यावर आनंद व्यक्त करतात. मात्र, आनंद साजरा करण्यासोबत नुकसानभरपाई मिळवण्याचा अधिकारही नागरिकांना आहे.
उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती मोहीम, तारांवरील झाडांच्या फांद्या कापणे आदी कारणांमुळे वीजपुरवठा बंद केला जातो. पावसाळ्यात वादळी वारा, पावसामुळे वीज जाते. याशिवायही अन्य काही कारणांमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वेळी कार्यालयात तक्रार केली जाते. मात्र, विजेचा पुरवठा काही ठोस कारणांशिवाय खंडित झाला तर त्याचा मोबदला नागरिकाला मिळाला पाहिजे, असा नियम आहे, असे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियुक्त केलेले ग्राहक प्रतिनिधी श्याम पाटील (धुळे) यांनी सांगितले.