India Languages, asked by ukpatel9147038, 8 months ago

वृथाभ्रमणकुक्रीडापरपीडापभाषणैः ।
कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रयेत

Answers

Answered by arpanbhowmick2
3

Answer:

aap khna Kya chahte ho?

mark me as the best

Answered by divya738457
2

Answer:

शीलं सद्गुणसम्पत्ति: ज्ञानं विज्ञानमेव च ।

उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।।

अर्थात - ज्याने चारित्र्य , चांगल्या गुणांची संपत्ती , ज्ञान विशेष ज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितकारकच असते.

खरं तर यामुळे ग्रंथ हे आपल्या जीवनाला आकार देणारे असतात. वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत होतोच त्याबरोबर जगाकडे पाहत असताना त्याला चांगलं आणि वाईट शोधण्याची एक अलौकिक दृष्टी प्राप्त होते. यामुळे त्याची समृद्ध जीवनाकडे वाटचाल होते.

१५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस निवडला गेला. डॉ. कलमांचे वाचनप्रेम हे सर्वश्रुत आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी , हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे. लेखनाची प्रवृत्ती प्रबळ व्हावी, कल्पना शक्तीला वाव मिळावा . दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव व्हावी आणि मन संवेदनशील व्हावे यासाठी वाचन महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनासाठी प्रवृत्त होणे ही काळाची गरज आहे.

Similar questions