Hindi, asked by khansana8613, 1 month ago

विद्यार्थ्यांनी 'शाळा परिसर' उद्यानात
वृक्षारोपण कार्यक्र मात उत्स्फूर्त
सहभाग घेतला. यासाठी त्यांचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by twinkle98562
0

Explanation:

वृक्षारोपणात विद्यार्थ्यांची भुमिका महत्वाची

म. टा. वृत्तसेवा, अकोले

पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर २० टक्के असलेले वन क्षेत्र ३० टक्के नेण्याची गरज आहे. हे काम शालेय विद्यार्थीच करू शकतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. जिथे पडीक, मोकळी जागा, टेकडी असेल तिथे झाडे लावली पाहिजेत. याकडे सामाजिक बांधिलकीतून पाहणे आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक बाबा खरात यांनी व्यक्त केले. श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी ५०० विद्यार्थ्यांनी ५०० झाडे हातात घेऊन राजूर शहरातून वृक्ष दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. 'झाडे लावा, झाडे जगवा, एक मूल एक झाड' जयघोष करीत शालेय विध्यार्थ्यानी आज वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी , ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास वनक्षेत्रपाल दिलीप जाधव , श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव बापू काळे , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे , जेष्ठ नागरिक संघाचे सुमंत वैद्य , चंद्रकांत जाधव , वनपाल पारधी , बुळे ,उपस्थित होते . प्रास्तविक प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांनी शासनाचा १३ कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प स्तुत्य असून शालेय जीवनात वृक्ष लागवड व संवर्धनाचा संस्कार विध्यार्थ्यांना मिळाल्यामुळे भविष्यात वृक्ष लागवड व संवर्धनचे काम शेवटच्या घटकापर्यंत निश्चित पोहचेल२०१६ या वर्षांपासून आमची शाळा या वृक्ष लागवडीत सहभागी झाली असून या वर्षी ५०० झाडांचे रोपण आम्ही निश्चित करणार गत वर्षी लावलेल्या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष उभी आहेत . तर प्रसंगी बाबा खरात म्हणाले विधार्थानो तुम्ही भाग्यवान आहात ज्ञानदान देण्याचे व घेण्याचे काम करीत असताना तुम्ही जे वृक्ष लागवड व संवर्धनचे काम करून पर्यावरण संतुलन राखण्याचे पवित्र काम करतात त्या कमला माझा सलाम आहे . येणाऱ्या काळात आपला देश वृक्ष श्रीमंतीचा देश असा

देश करण्यासाठी विध्यार्थ्यानी आपले योगदान देऊन आपल्या घरापासून एक झाड लावून सुरुवात करा ,यावेळी भाग्यवान धर्तीची लेकरं हे गीत गाऊन त्यांनी विध्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले . चौकट ---ज्या झाडाला फळे असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात काट्याच्या झाडाला कुणी दगड मार्ट नाही २००६ साली आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य योजना काढली त्यावेळी लोक हसत होते आज मात्र दादांचे समरण करतात त्यामुळे तुमच्या शाळेचे झाडे कुणी तोडली असेल तर काळजी करू नका यावर्षी त्यापेक्षा अधिक झाडे लावून त्यांच्या अपप्रवृत्तीला उत्तर द्या

कोट -दिलीप जाधव - महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवड योजना आणली त्यावेळी २ कोटी लागवड झाली २०१७ या वर्षात ४ कोटी वृक्ष लागवड नियोजन करण्यात आले मात्र त्यावेळी ५ कोटी वृक्ष लागवड झाली या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट व नियोजन असून वनविभाग व शासनाच्या या उपक्रमात आपला हातभार लागणे महत्वाचे आहे हि शाळा उपक्रमशील असून ती निश्चित आमच्या उद्दीष्ट पूर्तीत सहभागी होईल सुत्रसंचलन किरण भागवत तर आभार साहेबराव कानवडे यांनी मानले - सोबत फोटो वृक्षारोपण करून दिला पर्यवरण रक्षणाचा संदेश 500 झाडाचे रोपण

this is ur answer

Similar questions