India Languages, asked by prachimanojtawde, 6 months ago

writting skills
वर्णनात्मक निबंध
सफारीचा दिवस व वेळ
मी केलेली जंगल
सफारीचा हेतू व
तयारी
कधीही
न विसरता
पेणारा
अनुभव
सफर

जंगलातील सौंदर्य​

Answers

Answered by kirannalawade3636
3

Explanation:

सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. एवढ्यात रस्त्यात भेटलेल्या एका गावकऱ्याने सांगीतले की जवळच विहीरीत वाघाचे दोन बछडे पडले आहेत. आम्ही चक्क धावत धावत त्या जागी पोहोचलो. जंगलातील एका बिन कठड्याच्या विहीरीवजा खडड्यात ते दोन बछडे पडले होते. विहीरीत पाणी कमी होते आणो त्याच्या एका बाजूस खडक आणि कपारीत ते बच्चे बसून सौम्य गुरगुर करत होते. वन रक्षकाच्या मते ते ४/५ महिन्यांचे असावेत असा अंदाज होता आणि त्यांचा आकार साधारणत: कुत्र्याएवढा होता. हळूहळू अजुन काही लोक आणि इतर वन रक्षक जमा झाले. विहिरीच्या आत उतरून त्यांना काढावे असे सर्वानुमते ठरले. कोणी तरी एवढ्या बाजूचा एक लांब, जाड बांबू कापून आणला आणि त्यातल्या एका पिल्लाला बाजूला सरकवायचा प्रयत्न केला. ते पिल्लू हळूच गुरगुरले, त्याने आमच्याकडे बघुन दात विचकले आणि एक डावली त्या बांबूला मारली. तो ओलाकंच, ३/४ इंचाचा बांबू अक्षरश: पिचला. आता अर्थातच "आत" उतरून त्यांना बाहेर काढण्याची हिंमत कोण्याच्यात उरली नव्हती. हळूहळू उन्हे वर चढू लागली आणि वाघाच्या बछड्यांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते अजुन आत आत कपारीत शीरू लागली. त्यांना बाहेर काढण्याच्या हरएक प्रयत्नांना ते दाद देत नव्हते. शेवटी कुठून तरी दोरीची एक जाळी पैदा केली आणि ती विहिरीत आत सोडून पुढच्या बाजूने बांबूने ढोसून त्यांना त्या जाळीत ढकलायचा प्रयत्न केला. असा ५/६ वेळा प्रयत्न केल्यावर एकदा एक पिल्लू कसेबसे त्या जाळीत शिरले आणि त्याला आम्ही हलकेच वर ओढू लागलो. पण त्याचे वजन काही आम्हाला आणि त्या जाळीला पेलले नाही आणि ते पिल्लू खाडकन पाण्यात पडले. यामुळे दुसरे पिल्लू जाम घाबरले आणि एकदम आत जाउन बसले. ते पहिले पिल्लू मात्र मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मग आम्ही त्याला एका पिंजऱ्यात सुरक्षीत ठेवले. ते दुसरे घाबरलेले पिल्लू मात्र जाम बाहेर यायला बघत नव्हते. परत परत प्रयत्न करत अखेर दुपारी चारच्या सुमारस ते पिल्लू पण बाहेर काढण्यात आम्हा सर्वांना यश आले. आत प्रश्न होता त्या पिल्लांना कसे संभाळायचा ? मग संध्याकाळी त्यांना ठेवलेल्या पिंजऱ्याचे दरवाजे तसेच ऊघडे ठेऊन त्यांची आई त्यांना नेते का असे बघायचे ठरले. दुसऱ्या दिवशी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या रात्रीच त्यांच्या आईने त्यांना तिकडून सुरक्षीत ठिकाणी नेले. वाघाची आणि माझी ही पहिलीच भेट अशी अचानक पण चित्तथरारक होती. मात्र त्यावेळी माझाकडे कॅमेरा नव्हता ही खंत मला अजूनही लागून राहीली आहे. त्यानंतरही मी ताडोबाच्या जंगलात अनेक वेळा गेलो पण त्यातीथे मला नंतर एकदाही वाघ दिसला नाही.

175.jpg

यानंतर असाच एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाकहरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.

Similar questions