India Languages, asked by dipali888, 1 month ago

यां विषयावर निबंध लिहा
माझे​ आवडते शिक्षक
माझे गाव
मी पक्षी झालो तर

Answers

Answered by priyanshusingh9816
0

Explanation:

The population was mostly Hindu and Hindi-speaking. On 1 November 1956, Madhya Bharat, together with the states of Vindhya Pradesh and Bhopal State, was merged into Madhya Pradesh.Bundelkhand is a geographical and cultural region and also a mountain range in central India. The hilly region is now divided between the states of Uttar Pradesh and Madhya Pradesh, with the larger portion lying in the latter state.Mountains are divided into four main types: upwarped, volcanic, fault-block, and folded (complex). Upwarped mountains form from pressure under the earth's crust pushing upward into a peak. Volcanic mountains are formed from eruptions of hot magma from the earth's core.The Aravalli Range, an eroded stub of ancient mountains, is the oldest range of fold mountains in India. The natural history of the Aravalli Range dates back to times when the Indian Plate was separated from the Eurasian Plate by an ocean

Answered by janhavi0444
1

Answer:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांना खूप महत्व असते. तसेच त्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. शिक्षकांना एका देवापेक्षा सर्वात उच्च स्थान दिले जाते. कारण शिक्षक तेच असतात जे मुलांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती विकसित करतात.

आई – वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात पण त्यानंतर एक शिक्षक हि मुलांना पूर्ण रूपाने घडवण्याचे काम करतात. शिक्षक प्रत्येक मुलाला त्यांचे जीवनाविषयक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात.

एक शिक्षका शिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही आणि आपल्या जीवनात यश मिळवू शकत नाही. असे काही शिक्षक आहेत जे मुलांच्या जीवनासाठी आणि प्रेरणा बनतात

माझे गाव लोणखेडा .मी महाराष्ट्रातील लोणखेडा गावी राहते . पाच मिनिटांच्या अंतरावर तालुक्याचे शहादा गाव आहे. आमचे गाव लोणखेडा हे गोमती नदीच्या किनारी बसले आहे.त्यामुळे गावात शेतात जलसिंचनाची कामे केली जातात व भरपूर उत्पन्न मिळवले जाते.

लोणखेडा येथे पूज्य साने विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय आहे.येथील परिसरातील ,पंचक्रोशी तील , गावातील विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक आहे.

लोणखेडा त्याच्या पूर्वेला तीन चार किलोमीटर अंतरावर सातपुडा कारखाना आहे .यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळतो.अशा प्रकारच्या औद्योगिक वसाहतींमुळे देशातून विविध राज्यातून काही कुटुंबे येथे वसली आहेत. लोनखेडा येथील त्यांना रोजगार मिळतो व त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

आमच्या गावात दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होतो .गावाच्या विविध प्रकारचे झाडे लावली आहेत .त्यामुळे आमच्या गावात हिरवळीने नटलेले आहे .गावात विद्यालय,महाविद्यालय पण आहे.त्यामुळे माझे गाव साक्षर आहेत .आमच्या गावात दारूबंदी, नशाबंदी आहे.

आमचे गाव तंटामुक्त आहे .येथे सर्व मिळून मिसळून राहतात .गावात कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही व सर्व आपले काम करतात.आमच्या गावची ग्रामपंचायत खूपच छान आहे .गावात दवाखाना ,पोस्ट ऑफिस आहे .

गावकरी खूपच कष्टकरी आहे.दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करतात .गावात वेगवेगळे सण व उत्सव परंपरे नुसार खूप प्रेमाने उत्सव साजरे केले जातात .गावात होळी, जन्माष्टमी ,स्वातंत्र्य दिवस सारखे सर्व उत्सव साजरे होतात.

आजच्या आधुनिक काळात आमच्या गावात डिजिटल ग्रामपंचायत सुरू झाली आहे .यामुळे गावाच्या विकास होण्यास मदत होते .ई-सेवा केंद्र ,स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायती संकुल तयार करण्याचे काम सुरू आहे .यामुळे व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे.

गावात बचत गटांची स्थापना करण्यात आली आहेत.खरंच आमचे गाव खुप सुंदर आहे . मला माझा गावाच्या अभिमान आहे.

Similar questions