India Languages, asked by easha161105, 1 month ago

१४७
3) पुढील अपूर्ण कथेचा पूर्वार्ध लिहून कथा पूर्ण करा :
..ढवळ्याने विचार केला, मी पवळ्यापेक्षा अधिक हुशार व
ताकदवान आहे. मग मी याच्यासोबत जर सर्वांना दिसलो, तर मलाही
पवळ्यासारखेच कमी ताकदीचे समजतील. यापुढे मी एकटाच शेतात
जाणार व सगळी कामे एकट्याच्या ताकदीवर मालकांना करून दाखवणार.
यामुळे सर्वत्र फक्त माझेच कौतुक होईल.
मनात ठरवल्याप्रमाणे ढवळ्या पवळ्यासोबत अंतर ठेवून वागू
लागला. मालकांचे मन कसे जिंकावे, सतत स्तुती कशी ऐकावी याच्या
नवनवीन युक्त्या शोधू लागला. पवळ्याला ढवळ्याचे बदललेले वागणे
काही समजेना. ढवळ्याचा पवळ्याबद्दलचा मत्सर मात्र वाढू लागला.
खोट्या स्तुतीसाठी ढवळ्या सगळी कामे एकटाच करू लागला.
हे त्याच्या शरीराला त्रासदायक होत होते. हळूहळू हे सर्व गोविंद
शेतकऱ्याच्या ध्यानी आले. मग ढवळ्याला धडा शिकवण्यासाठी
त्यानेही एक युक्ती शोधली.
एके दिवशी भल्या पहाटे गोविंद शेतकरी ढवळ्याला म्हणाला, “तू
फारच ताकदवान आहेस. पण तुझ्या ताकदीचा उपयोग माझ्यासारख्या
साध्या शेतकऱ्याला नाही. माझी कामे साधी शेतातली. ते तर पवळ्या
एकटाही करू शकतो. शहरात माझा दोस्त राहतो. तिथे तुझ्या मेहनतीचे
चीज होईल. आज मी तुला शहरात सोडून येतो.' हे ऐकताच ढवळ्या
गडबडला. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. आपल्या सर्व युक्त्या
मालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपली पाठवणी शहरात करायचे
ठरवले आहे, हे आता त्याला कळून चुकले होते. ढवळ्याने गोविंद
शेतकऱ्याची क्षमा मागितली. पवळ्यासोबत पुन्हा असे वागणार नाही,
हे वचन दिले. पवळ्याला ढवळ्याची मैत्री प्रिय होती. दोघे पुन्हा
गुण्यागोविंदाने शेतात काम करू लागले.​

Answers

Answered by baruelaghel
1

Answer:

sorry

Explanation:

I don't understand your language

Similar questions