अमृतानुभवचि रचना कोणत्या संतांनी केली?
Answers
Answered by
3
hii mate
'अमृतानुभव' हा ग्रंथ ज्ञानोत्तर भक्तीच्या म्हणजेच भागवत धर्माच्या पायाभूत सिद्धान्ताच्या सिद्धीसाठी लिहिला आहे. 'ज्ञानेश्वरी'नंतर काही दिवसांनी ज्ञानदेवांनी 'अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. त्याचा कालखंड निश्चित स्वरूपात कोणता असावा याविषयी मतभेद असतील. परंतु 'अमृतानुभव' हा ग्रंथ इ. स. १२९० ते १२९६ या कालावधीत लिहिला असावा. ज्ञानेश्वरी हे गीतेचे एक भाष्य आहे. गीतेच्या तत्त्वचिंतनावर स्वत:च्या प्रज्ञेचा स्वतंत्र आविष्कार घडवून 'ज्ञानेश्वरी'च गीता होऊन नटली आहे; पण अमृतानुभवाचे तसे नाही. 'अमृतानुभव' हा ज्ञानदेवांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याची ओवीसंख्या ८०६ इतकी असून, दहा प्रकरणांत त्याची विभागणी केली आहे. महाराष्ट्र शारदेला तत्त्वविवेचनात्मक ग्रंथाचे जे अलंकार समर्पित केले त्यात 'अमृतानुभव' हा ग्रंथ शिरपेचाप्रमाणे शोभतो.
Similar questions
Computer Science,
3 months ago
Math,
8 months ago
Science,
8 months ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago