Hindi, asked by alishanaaz6585, 9 months ago

भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्या

Answers

Answered by anushkan477
0

Explanation:

ज्यास हवे त्यास आरक्षण !

·         विषमता दूर करण्यासाठी मागे राहिलेल्यांना वर काढणे हा आरक्षणाचा उद्देश. सध्या शिक्षण, सरकारी नोकऱ्या व राजकीय क्षेत्रात आरक्षण ठेवले जाते.

·         जाती, जमाती आणि आर्थिक मागासलेपणा या आधारावर आरक्षणाचे निकष बेतले गेले आहेत.

·         विषमता आणि आर्थिक, सामाजिक दुर्बलता सर्वच धर्म, जातीत व जमातीत आढळून येते.

·         तेंव्हा, सर्वाना समान संधी उपलब्ध होण्यासाठी जाती, जमातीवर आधारित आरक्षण थांबवणे आवश्यक आहे.

·         आरक्षण अत्यंत आवश्यक आहे परंतु त्याचे फायदे दुर्बल घटकांना, गरजेनुसारच मिळावेत.

·         अशिक्षित कुटुंबातील विध्यार्थी सुशिक्षित कुटुंबातील विध्यार्थ्यास मिळणाऱ्या पायाभूत ज्ञानापासून वंचित रहातो. खेड्या-पाड्यातील विध्यार्थी आणि शहरी भागातील विध्यार्थी यांची तुलना योग्य नव्हे. आर्थिक निकष यात फारसा परिणाम करत नाही.

·         ग्रामीण भागातील शाळा-कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी शैक्षणिक प्रत आणि सोयी मधील फरकामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांची बरोबरी साधू शकत नाहीत.

·         आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी महागड्या शिक्षण संस्थामध्ये अभ्यासाची संधी परवडत नसल्याने त्या सोयीपासून वंचित रहातात.

·         पालक कार्यरत असलेल्या क्षेत्रात मुलांचा कल रहातो आणी फायदाही दिसतो उदा. डॉकटरांच्या मुलाना डॉकटरी क्षेत्रात तर इन्जीनियारांच्या मुलाना अभियांत्रिकीत गती दिसते आणि लाभही होतो, वरिष्ठ सरकारी नोकरांची मुले त्याच क्षेत्रात तर राजकारण्यांच्या मुलाना राजकारणात फायदा मिळतो ई.

·         डॉक्तारांची डॉक्तारांशी लग्ने, वरिष्ठ अधिकाऱ्याची आपापसात, व्यापारी उद्योगपतींच्या मुलांनी त्याच क्षेत्रातील जोडीदार निवडणे हे सर्व साहजिक व सोयीस्कर असले तरी समाजाच्या संरचनेस हे पोषक नक्कीच नाही. एकसंध, योग्य मिश्रित  समाज ही खरी गरज आहे.

योग्य मार्ग

·         मागे राहिलेल्यांना वर काढण्यासाठी आरक्षणाचे निकष ठाम असावेत – शिक्षण, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती व पेशा.

·         शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गास – अशिक्षित कुटुंबातील व खेड्या-पडयातील विध्यार्थ्यांसाठी- प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये प्रवेशासाठी आरक्षण हवे.

·         प्रत्येक अभियांत्रिकी विद्यालयात इंजिनियर नसलेल्यांची मुले, मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर नसलेल्यांची मुले, इतर सर्व शाखांमध्ये त्या शाखेत नसलेल्यांची मुले अशा पद्धतीने आरक्षण ठेवावे.

·         असे आरक्षण सरकारी मदत असो वा नसो, किंबहुना सर्व खाजगी संस्थांमध्ये एकसारखे राहावे.

·         

Similar questions