composition on my favorite game in marathi
Answers
Answer:
क्रिकेट हा खेळ सर्वप्रथम १३ व्या शतकात ब्रिटिशांद्वारा खेळला जात असे. जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले तेव्हा क्रिकेट हा खेळ आपल्या देशातही खेळू जाऊ लागला. आपल्या भारत देशात सन १९७२ मध्ये क्रिकेट हा खेळ कलकत्ता येथे खेळला गेला.
हळूहळू हा खेळ इतर ठिकाणी खेळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर क्रिकेट हा खेळ भारत देशाच्या कानाकोपऱ्यात खेळला जाऊ लागला. आज २१ व्या शतकात क्रिकेट हा खेळ सर्वांचा आवडता खेळ बनला आहे.क्रिकेट हा खेळ एक बॉल आणि बॅटने खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी मैदानाची गरज असते. क्रिकेटच्या संघामध्ये ऐकून ११ खेळाडू असतात. यातील काही फलंदाज असतात. तर काही खेळाडू हे गोलंदाजी आणि फलंदाजी हे दोन्ही करू शकतात.अशा खेळाडूंना अष्टपैलू म्हटले जाते.प्रत्येक क्रिकेट संघाचा एक विकेटकीपर असतो. जो विकेटच्या मागे उभा असतो. या खेळामध्ये बऱ्यचाह गोष्टींची काळजी घेतली जाते. क्रिकेटच्या खेळात सामन्याचा कालावधी, नाणेफेकांचा काळ आणि पंचांची स्थिती व नियम असतात.
जेव्हा बॉलने फलंदाजी केल्यावर खेळपट्टी चालवली जाते त्याला रन असे म्हणतात. तसेच एक खेळाडू आऊट झाल्यावर त्या जागी दुसरा खेळाडू येतो. अशाप्रकारे जेव्हा या खेळातील १० खेळाडू बाद होतात तेव्हा संपूर्ण संघ हा ऑल आऊट होतो.आज आपल्या देशात क्रिकेट हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. येथे क्रिकेटचे सामने आणि स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. बऱ्याच वेळा इत्तर देशातील संघ सुद्धा येथे खेळायला येतात. क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी लाखो क्रीडाप्रेमी मैदानाकडे वळतात.
तसेच आजकाल क्रिकेट या खेळाला गावापासून ते शहरापर्यंत चालना मिळाली आहे. आज प्रत्येक व्यक्ती हा खेळ खेळतो. त्याच प्रमाणे क्रिकेट हा खेळणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंचा खूप आदर केला जातो.
