CBSE BOARD X, asked by yash1536, 11 months ago

essay on Kapil Dev in marathi

Answers

Answered by Krupavadukul
3
Heyy mate here is your essay....


पहिल्या वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देवला यंदा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बीसीसीआयतर्फेे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

नवी दिल्ली: पहिल्या वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देवला यंदा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बीसीसीआयतर्फेे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 

बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन, सचिव संजय पटेल आणि पत्रकार अयाझ मेमन या त्रिसदस्यीय समितीने कपिल देव यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारतीय क्रिकेटसाठी मैदानात आणि मैदानाबाहेर भरीव कामगिरी करणाऱ्यास बीसीसीआयच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कसोटी कर्णधार कर्नल सी. के. नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. 

ट्रॉफी, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा चेक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे वितरण कधी होणार याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी हा पुरस्कार लाला अमरनाथ, सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे, के. एन. प्रभू, पी. आर. उम्रीगर, हेमचंद्र अधिकारी, सुभाष गुप्ते, मन्सूर अली खान पतौडी, भाऊसाहेब निंबाळकर, चंदू बोर्डे, बी. एस. बेदी, बी. चंद्रशेखर, प्रसन्ना, एस. वेंकटराघवन, नरिमन कॉन्ट्रक्टर, गुंडप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, सलिम दुरानी, अजित वाडेकर, सुनील गावसकर यांना देण्यात आला आहे. 
कपिलने १३१ कसोटी सामन्यांत ८ शतक आणि २७ अर्धशतकांसह ५२४८ धावा केल्या आहेत. तसेच ४३४ विकेट्सही टिपल्या आहेत. कसोटीत पाच हजार धावा आणि ४०० विकेट्स घेणारा कपिला हा पहिलाच खेळाडू आहे. त्याने २२५ वनडे सामन्यांत ३७८३ धावा केल्या असून, २५३ विकेट्सही घेतल्या आहेत. 

कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. २००७मध्ये इंडिनय क्रिकेट लीगमध्ये भाग घेतल्याने त्याच्यात व बीसीसीआयमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यानंतर बीसीसीआयने त्यांचे एक रकमी मानधनही रोखले होते. अखेर गेल्या वर्षी हा वाद संपुष्टात आला. 




Answered by Anonymous
8
hello✌
-----------------------------------------------------------------
कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेटविश्वचषक जिंकला होता. == क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला. नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसर्‍या डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्या सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेतले. १९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या. दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. १९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. १९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने (आणि हरयाणानेही) गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, अ‍ॅबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसर्‍या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.
-----------------------------------------------------------------
#HOPE IT HELPS U

#PLZ MARK ME BRAINLIST

#ENJOY YOUR LIFE ❤❤

#RUDEBOY✌✌

Anonymous: sun
Anonymous: mera
Anonymous: doubt solve karegi
yana85: Bolo
Anonymous: ruk post karta hoon question
Anonymous: see the question
yana85: Ok
Anonymous: aya apko
Anonymous: all the best dear ❤
yana85: Thanks
Similar questions