History, asked by arjunprochavan, 6 months ago

information on Sant namdeo in Marathi​


nirupamavelamala: thanls for brainliest
arjunprochavan: ok
Jaymishra200312: please like my answer

Answers

Answered by Jaymishra200312
3

Answer:

Namdev, also transliterated as Nam Dayv, Namdeo, Namadeva, was an Indian poet and saint from Narsi, Hingoli, Maharashtra India who is significant to the Varkari sect of Hinduism.

Born: 26 October 1270, Narsi

Died: 3 July 1350, Pandharpur

Attachments:
Answered by nirupamavelamala
2

Explanation:

(२६ ऑक्टोबर१२७०–३जुलै १३५०).वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक. पित्याचे नाव दामाशेटी; आईचे गोणाई. नरसी-बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते; तथापि हे गाव नेमके कोठले ह्याबद्दल अभ्यासकांत ऐकमत्य नाही.कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे.

नरसी-बामणीचा ‘नरसी-ब्राह्मणी’ असा उल्लेख करूनमहाराष्ट्रसारस्वतकारवि.ल.भावे ह्यांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे;तथापि असे गाव सोलापूर जिल्ह्यात नाही. मराठवाड्यात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत.त्यांतील अंतरही फारसे नाही.

नरसी ह्या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणीहेही ह्याच परिसरातले.नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानलेजाते.नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे.त्यात “गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण।संसारी असोन नरसीगावी।।”असा निर्देश सापडतो.

नामदेवांचाजन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. वि.ल.भावे व महाराष्ट्रकवि चरित्रकार ज.र.आजगावकर ह्यांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले; तथापि नामदेव पंढरपुरी जन्मल्याचा निर्वाळा बहुतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे.एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव- चरित्रावरून नामदेवांच्या आईने पुत्रप्राप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही ह्या चरित्रात नमूद आहे.

नामदेवांच्यानावावर मोडणारे उपर्युक्त ‘आत्मचरित्र’ हा नामदेवांचे चरित्रविषयक तपशील जाणून घेण्याच्या दृष्टीने उपयोगात आणला जाणारा एक मुख्य आधार आहे.त्यानुसार असे दिसते,कीनामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता.‘शिंपियाचे कुळी जन्म मज झाला’ असेत् यातम् हटले आहे.नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते.नामदेवांनाही बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटूनप्राण द्यावयास निघाले आणि भक्त वत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका आहे.

नामदेवांचा विवाह राजाई नावाच्या स्त्रीशी झालेला होता आणि तिच्यापासून त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले; लिंबाई नावाची एक मुलगी झाली. विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होतचालले. घरातील परिवार मोठा होता. त्याची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांस वाटे. त्यामुळे नामदेवांच्या विठ्ठल वेडाला त्यांच्या घरातूनविरोध होऊ लागला.नामदेव भक्ती परमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत; उलट हे कुटुंबच भक्तिमार्गाशी समरसले.

सुमारे १२९१ मध्ये नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी.आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, ह्याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला;त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. अशी आख्यायिका आहे, की नामदेवविसोबांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते.तेदृश्यपाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हाविचार नामदेवांच्या मनालाभिडला.गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला.विशुद्धभक्तीलाअद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.

पुढे श्रीज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि ‘भूतळीची तीर्थे पहावी नयनी’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ‘सर्वसुख आहे मज पांडुरंगी’ अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळेतीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती; परंतु अखेरीस ते ज्ञानदेवांबरोबर निघाले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झालेले होते. रतातीलअनेक तीर्थे त्यांनी पाहिली. ह्या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली (१२९६). तो रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्यावेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते आणि त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी वेचिली.‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावूजगी’ ही त्यांची भूमिका होती.

नामदेवांच्या चरित्राचे आणि कार्याचे एक अभ्यासक ग. वि. कविटकर ह्यांनी असे मत मांडले आहे, की ह्या दीर्घकाल खंडात मदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या;दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या; त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःलानामदेवम् हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नावम् हणून स्वीकारले; गुजरात, सौराष्ट्र,सिंधुप्रदेश,राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश येथे हीनामदेवांचे वास्तव्य झाले होते. लोक जागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी विविधप्रदेशांतील भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या,असे ही कविटकर ह्यांचेप् रतिपादन आहे.


Jaymishra200312: bro or sis please like this answer
nirupamavelamala: ok
Similar questions