Hindi, asked by manojwishwakarm5948, 11 months ago

जम्मु आणि काश्मिर येथील दहशदवादी नेते

Answers

Answered by kvnmurthy19
0
काश्‍मीरमधील विभाजनवादाला धार्मिक संदर्भाची किनार आहे. मात्र उर्वरित भारतातील धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादी आक्रमकतेने काश्‍मीरमधील पत्रकारांच्या तटस्थतेला आणखी तडे गेले आहेत. त्यांना तर दोन्ही बाजूंकडून निष्ठेची परीक्षा द्यावी लागत आहे.



जम्मू- काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी सरकारची भूमिका आहे. काश्‍मीरच्या नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी, तसेच वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांचीही हे राज्य आपल्या हातून जाता कामा नये, अशीच भावना असते. १९८७ मधील वादग्रस्त निवडणुकीनंतर तेथील विभाजनवादाने दहशतवादाचे वळण घेतले. बुऱ्हाण वाणी २०१६ मध्ये मारला गेल्यानंतर सुरक्षा दलांवर थेट हल्ले सुरू झाले व या लढ्याला ‘इस्लामिक स्टेट’चा आशय प्राप्त झाला. त्यामुळे काश्‍मीरमधील हिंसाचाराबाबत उर्वरित देशात घृणा आणि उपेक्षा दिसू लागली. तेथील हिंसाचारात नागरिक, अतिरेकी व सुरक्षा दलाचे मिळून ७० हजार लोक गेल्या तीस वर्षांत मारले गेले. पंजाबमध्ये १९८३ ते ९३ या दहा वर्षांत खलिस्तान चळवळीने ३५ हजार लोकांचा बळी घेतला. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, अकाली नेते संत लोंगोवाल, मुख्यमंत्री बेअंतसिंग, तसेच विविध पक्षांच्या नेत्यांचा अंत झाला. काश्‍मीरमध्येही मिरवैझ फारूख, अब्दुल गनी लोण या नेत्यांचा बळी गेला. परंतु, त्याचे पडसाद देशाच्या इतर भागांत तेवढ्या तीव्रतेने उमटले नाहीत. कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर वैचारिक वर्तुळात ज्या प्रकारे प्रतिक्रिया आली, तशी काश्‍मीरमधील नामवंत पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर पत्रकारितेच्या क्षेत्रातूनही आलेली दिसत नाही. व्यावहारिक पातळीवर काश्‍मीर खोरे आपल्यापासून किती तुटले आहे, हे यातून दिसले.
बुखारी यांच्या हत्येमागे कोण आहे, याविषयी विविध तर्क आहेत. पाकिस्तानी लष्कर, ‘हुरियत’चे विभाजनवादी, तसेच काही दहशतवादी गटांची नावे चर्चेत आहेत. तपासातून आलेच तर सत्य बाहेर येईलही. परंतु, या निमित्ताने उर्वरित भारतातील लोक काश्‍मीरमधील पत्रकारांविषयी संशयाच्या भावनेतून उदासीन बनल्याचे दिसले. दहशतवादग्रस्त प्रदेशात पत्रकारिता म्हणजे विस्तवावरून चालणे. दहशतवाद फोफावण्यात प्रसारमाध्यमे प्राणवायूचे काम करतात, असे म्हटले जाते. मर्यादित अर्थाने त्यात तथ्य असले, तरी व्यवसायाशी प्रामाणिक, निष्ठा असलेले पत्रकार विविध बाजूंनी संशयाने पाहिले जात असले, तरी आपले कर्तव्य पार पाडीत असतात. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाची धार्मिक, राजकीय मते असतात. सभोवतालची परिस्थिती त्यात दबाव टाकून व्यावसायिकतेची परीक्षा बघत असते. शुजात बुखारी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक होते. त्यांचा अग्रक्रम शांतता प्रस्थापित होणे, भारत-पाक संवाद सुरू करणे, काश्‍मिरींना त्यात स्थान असणे व त्यातून सर्वमान्य तोडगा काढणे, असा होता. अर्थात त्यांच्या हेतूंविषयी दोन्ही बाजूंना संशय होता. त्यातच त्यांचा बळी गेला.

Similar questions