Man changes in earth Marathi eassy
Answers
Answer:
पृथ्वीचा इतिहास या लेखात पृथ्वी ग्रहाच्या रचनेपासून ते आजपर्यंतच्या ४.६अब्ज वर्षांच्या उत्पत्तीच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि मूलभूत टप्प्यांची माहिती दिलेली आहे. पृथ्वीचे वय ब्रह्मांडाच्या वयाच्या साधारण एक तृतीयांश आहे. या कालावधीमधे भौगोलिक आणि जैविक स्तरावर अफाट बदल घडले आहेत.
भूगर्भशास्त्रीय कालदर्शिका संपादन करा
मुख्य पान: भूगर्भशास्त्रीय कालदर्शिका
पृथ्वीचा इतिहास दाखवण्यासाठी भूगर्भशास्त्रीय कालदर्शिका वापरतात. ज्यामध्ये पृथ्वीच्या इतिहासाचे प्रस्तरशास्त्रीय विश्लेषणानुसार वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वर्गीकरण केले आहे, असे हे एक कोष्टक आहे .
सूर्यमालेची निर्मिती संपादन करा
प्रोटोप्लॅनेटरी तबकडीचे काल्पनिक चित्र.
मुख्य पान: सूर्यमालेची रचना आणि निर्मिती
धूळ आणि वायू यांपासून बनलेल्या, चक्राकार फिरणाऱ्या एका महाकाय ढगापासून पृथ्वीसकट संपूर्ण सूर्यमालेचा जन्म झाला. या ढगास सौर तेजोमेघ असे म्हणतात. साधारण १३.७ अब्ज वर्षांपूर्वी घडलेल्या महास्फोटामध्ये उत्पन्न झालेल्या हायड्रोजन, हेलियम, आणि इतर विस्फोटक ताऱ्यामधून उत्सर्जित झालेल्या जड मूलद्रव्यांपासून पासून सौर तेजोमेघ बनलेला होता. साधारण ४.६ अब्ज वर्षांपूर्वी हा तेजोमेघ आकुंचन पावू लागला. अशी कल्पना आहे की जवळपासच्या एका सुपरनोव्हाच्या आघात तरंगांमुळे आकुंचन प्रक्रियेला सुरुवात झाली असावी आणि त्याच बरोबर, तेजोमेघाला चक्राकार गती मिळाली असावी. तेजोमेघाच्या चक्राकार फिरण्याचा वेग जसा वाढत गेला तसा, गुरुत्वाकर्षण आणि जडत्वामुळे परिवलनाच्या अक्षालगत तो तेजोमेघ चपटा होऊन एका प्रोटोप्लॅनेटरी तबकडीमध्यॆ[मराठी शब्द सुचवा] रूपांतरित झाला. बहुतांश द्रव्य केंद्रात स्थिरावले आणि त्याचे तापमान वाढू लागले. तबकडीतील द्रव्याच्या वाटणीत विषमता होत्या. तुलनात्मक दृष्ट्या कुठे द्रव्य विरळ होते तर दुसरीकडे घन होते. या विषमतांमुळे तबकडीच्या द्रव्यात अंतर्गत टकरी सुरू झाल्या. यामुळे व घन द्रव्याच्या स्वतःच्या अशा वेगळ्या परिवलन गतीमुळे विभागणीतील विषमता वाढत गेली आणि काही घनकिलोमीटर आकारमानाचे ग्रहपिंड बनू लागले.
द्रव्याचे आकुंचन, परिवलन गतीची वाढ आणि चिरडून टाकणारे गुरुत्वाकर्षण यामुळे तबकडीच्या केंद्रात प्रचंड प्रमाणावर गतिजन्य उष्णता निर्माण झाली. या साठणाऱ्या ऊर्जेचे उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यासाठी कोणताही प्रयायी मार्ग उपलब्ध नसल्याने केंद्राचे तापमान प्रचंड वाढू लागले. अखेरीस, हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर होण्याची केन्द्रकीय संमीलन प्रक्रिया सुरू झाली. परिणामी, द्रव्याचे अधिक आकुंचन झाले आणि बनलेल्या टी टौरी ताऱ्याचे अंतर्गत प्रज्वलन होऊन सूर्याचा जन्म झाला.
Answer:
मुख्य पान: सूर्यमालेची रचना आणि निर्मिती
धूळ आणि वायू यांपासून बनलेल्या, चक्राकार फिरणाऱ्या एका महाकाय ढगापासून पृथ्वीसकट संपूर्ण सूर्यमालेचा जन्म झाला. या ढगास सौर तेजोमेघ असे म्हणतात. साधारण १३.७ अब्ज वर्षांपूर्वी घडलेल्या महास्फोटामध्ये उत्पन्न झालेल्या हायड्रोजन, हेलियम, आणि इतर विस्फोटक ताऱ्यामधून उत्सर्जित झालेल्या जड मूलद्रव्यांपासून पासून सौर तेजोमेघ बनलेला होता. साधारण ४.६ अब्ज वर्षांपूर्वी हा तेजोमेघ आकुंचन पावू लागला. अशी कल्पना आहे की जवळपासच्या एका सुपरनोव्हाच्या आघात तरंगांमुळे आकुंचन प्रक्रियेला सुरुवात झाली असावी आणि त्याच बरोबर, तेजोमेघाला चक्राकार गती मिळाली असावी. तेजोमेघाच्या चक्राकार फिरण्याचा वेग जसा वाढत गेला तसा, गुरुत्वाकर्षण आणि जडत्वामुळे परिवलनाच्या अक्षालगत तो तेजोमेघ चपटा होऊन एका प्रोटोप्लॅनेटरी तबकडीमध्यॆ[मराठी शब्द सुचवा] रूपांतरित झाला. बहुतांश द्रव्य केंद्रात स्थिरावले आणि त्याचे तापमान वाढू लागले. तबकडीतील द्रव्याच्या वाटणीत विषमता होत्या. तुलनात्मक दृष्ट्या कुठे द्रव्य विरळ होते तर दुसरीकडे घन होते. या विषमतांमुळे तबकडीच्या द्रव्यात अंतर्गत टकरी सुरू झाल्या. यामुळे व घन द्रव्याच्या स्वतःच्या अशा वेगळ्या परिवलन गतीमुळे विभागणीतील विषमता वाढत गेली आणि काही घनकिलोमीटर आकारमानाचे ग्रहपिंड बनू लागले.
द्रव्याचे आकुंचन, परिवलन गतीची वाढ आणि चिरडून टाकणारे गुरुत्वाकर्षण यामुळे तबकडीच्या केंद्रात प्रचंड प्रमाणावर गतिजन्य उष्णता निर्माण झाली. या साठणाऱ्या ऊर्जेचे उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यासाठी कोणताही प्रयायी मार्ग उपलब्ध नसल्याने केंद्राचे तापमान प्रचंड वाढू लागले. अखेरीस, हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर होण्याची केन्द्रकीय संमीलन प्रक्रिया सुरू झाली. परिणामी, द्रव्याचे अधिक आकुंचन झाले आणि बनलेल्या टी टौरी ताऱ्याचे अंतर्गत प्रज्वलन होऊन सूर्याचा जन्म झाला.