India Languages, asked by LakishaPatil, 4 months ago

मराठी निबंध :- शाळा बंद झाली तर ​

Answers

Answered by Umar1324
17

Answer:

Explanation:

लॉकडाउननंतरच्या काळात ग्रामीण, आदिवासी भागातील शाळा आणि तिथली मुलं यांचं शिक्षण कसं होणार हा आज अत्यंत कळीचा प्रश्न आहे. ना तंत्रज्ञान, ना मोबाइल, ना रेंज. पण तरीही काही धडाडीच्या शिक्षकांनी त्यावर अफलातून उपाय शोधलेत.

शाळकरी मुलांचे जून 2019 पासून सुरू झालेले शैक्षणिक सत्न एप्रिलमध्ये परीक्षा घेऊन संपते, मात्न यावर्षी अचानक 22 मार्चपासून शाळांना सुट्टी लागल्यामुळे मुलांसह पालक व शिक्षकही चिंतावले. जूनमध्ये शाळा सुरू होतील, की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

आजघडीला राज्यातील ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी शाळा बंद; पण शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे या हेतूने मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्नी प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील व आयटी उपसंचालक विकास गरड यांनी पुढाकार घेऊन ‘दीक्षा अँप’च्या माध्यमातून ते पोहचवणे सुरू केले आहे. याचा लाभ दररोज ग्रामीण भागातील दोन लाख मुले घेताना दिसतायेत.

दि. 13 एप्रिल 2020 पासून पहिली ते दहावीच्या मार्च-एप्रिलमधील अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासमाला सुरू होती. दीक्षा नावाच्या अँपवर ते प्रसारित केले जाते आहे.

दीक्षा अँपमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे 9700हून अधिक व्हिडीओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत.

मात्र खरी चिंता होती ती ग्रामीण भागात. जिथे ना मोबाइलची रेंज, ना शिक्षणाच्या कुठल्या सुविधा. या ग्रामीण भागातील मुलांना पाठय़पुस्तक व पाठय़पुस्तकाबाहेरचे म्हणजेच परिघाबाहेरचे शिक्षण देणारे काही शिक्षक मनापासून काम करताहेत.

ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील हे शिक्षक मुलांचे शिक्षण बंद पडू नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मुलांची शिक्षणाची गोडी वाढवताहेत. शाळा प्रत्यक्ष बंद असली तरी त्यांचे शिक्षण मात्र सुरू आहे. असे उपक्रमच ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देऊ शकतील.

Similar questions