Hindi, asked by vikastanpure96, 1 month ago

मत्री चे महत्त्व सांगणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार​

Answers

Answered by singhsandeep22013
7

Explanation:

मत्री चे महत्त्व सांगणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार

Answered by Rameshjangid
0

Answer:

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.

मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.

मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड, Spiritual friendship, पाळीव प्राणी, मित्र, वगैरे.

Explanation:

Step : 1म्हण (हिंदी कहावत, बांगला प्रवाद, संस्कृत लोकोक्ति, आभाणक व इंग्लिश प्रॉव्हर्ब) ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्‍मयकृती असते.

Step : 2संक्षेपाबरोबरच यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, उपमा इ. अलंकारांमुळे ती चटकदार बनते. त्या त्या समाजाच्या संस्कृतीमधले विशिष्ट विषयाबद्दलचे शहाणपण तिच्यात साठवलेले आणि पुढच्या पिढीच्या हवाली केलेले असते. यूरोप, आशिया, आफ्रिका, पॅसिफिक बेटे यांमधल्या शेती, ग्रामरचना, धर्म, कारागिरी यांच्याभोवती केंद्रित झालेल्या संस्कृतींमधून म्हणी विपूल आढळतात. उत्तर दक्षिण अमेरिकेतील आदिवासी संस्कृतीत म्हणींचा अभाव दिसतो.

Step : 3वाक्प्रचार (हिंदी मुहावरा, बांगला प्रवचन व इंग्लिश इडियम) हा म्हणीप्रमाणे स्वयंपूर्ण नसतो (म्हणीला तर पंचांसमोरच्या न्यायदानात आधार म्हणून वापरण्याइतकी प्रतिष्ठा असते.) जगातल्या कोणत्याही भाषेत एकेरी शब्दांबरोबर ज्यांचा अर्थ सहजगत्या न लागता रूढीने लागतो असे शब्दसमूह आणि कधी वाक्ये असतात आणि ती लहान मुलाला असो किवा परक्याला असो स्वतंत्रपणे शिकून घ्यावी लागतात. ‘गागर मे सागर’ या हिंदी वाक्प्रचाराचे ‘घागरीत समुद्र’ किवा ‘घोडामैदान जवळ आहे’ या मराठी वाक्यरूप वाक्प्रचाराचे ‘घोडे का मैदान पास है’ असे भाषांतर करून भागणार नाही. सुटा वाक्प्रचार स्वयंपूर्ण नसतो, सुट्‍ट्या शब्दांप्रमाणे तो संदर्भातच जिवंत होतो.

Step : 4(‘काखेत कळसा, गावाला वळसा’, हे वाक्य म्हणजे सुटा विचार सागणारी म्हण नसून समोरच्या प्रसंगाचे केवळ वर्णन करणारा तो वाक्प्रचार आहे) काही वाक्प्रचार तर संदर्भात इतके गुरफटलेले असतात की त्यांचा अर्थ सरळपणे नीट लागत नाही. रूढीनेच तो लावावा लागतो. हे फक्त परक्याच्याच लक्षात यावे; उदा., पायात जोडा, गळ्यात हार, नाकात नथ घालणे, नदीवर-घरावरून-जाणे, नळ येणे, नळ जाणे, प्रवासात नवीन गाव येणे; अविकसीत देश हे वाक्प्रचार आहेत हे स्वकीयांच्या लक्षातही येणार नाही. काही वाक्प्रचार मात्र त्यांच्या चटकदारपणामुळे किंवा ठसठशीतपणामुळे स्वकीयांच्याही लक्षात यावेत; उदा., पी हळद नि हो गोरी; टाळूवरचे लोणी खाणे.

Step : 5म्हणी व वाक्प्रचार यांच्यात अंतर असले, तरी त्यांचा जो एकत्र विचार करण्याचा प्रभाव दिसतो, तो त्यांच्यामधल्या काही साम्यांमुळे आहे. दोन्हींत सास्कृंतिक संदर्भाच्या आणि अर्थालंकारांच्या बळावर थोडक्यात बराच अर्थ आणलेला असतो. कधी ही संस्कृती जुनावलेली असते (ब्राह्मणाची बाई काष्ट्याशिवाय नाही, संपुष्टात येणे.); तर कधी दोन्हींना अशिष्ट संदर्भ (पाणी घालताना लोंबतय काय विचारू नये; मुंगीला मुताचा पूर) आणि जुनावलेली भाषा (एकावे जनाचे करावे मनाचे, कोणाला कशाचे वावडे नसणे.) चालते. शब्दाप्रमाणेच अशिष्ट [→ अशिष्ट प्रयोग] म्हणी-वाक्प्रचारही विनोदी असतात (कानडीत म्हणतात : प्यायला कांजी पण मिशा उचलून धरायला नोकर लागतो.). सांस्कृतीक दृष्टीने जवळ असणाऱ्या भाषांतून म्हणींचे किंवा वाक्प्रचारांचे साम्य दिसले तर त्यात नवल नाही; उदा.,

To learn more about similar question visit:https://brainly.in/question/37777231?referrer=searchResults

https://brainly.in/question/8889522?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions