India Languages, asked by Bhagabandas7108, 9 months ago

mumbai chi zali tumbai essay in marathi

Answers

Answered by rudraverma2066
1

Answer:

मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.

मुम्बई १८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुम्बई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून बनवली.[१] १९व्या शतकात मुम्बईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुम्बईतच मजबूत झाला. इ. स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुम्बई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुम्बई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुम्बई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुम्बई करण्यात आलं.

मुम्बई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुम्बई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुम्बईत अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुम्बईत येतात.

मुम्बई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुम्बईच्या हद्दीतच आहे.

मुम्बईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते, ज्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इण्डिया कम्पनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केला आणि मुम्बईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी वेल्लार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुनर्प्राप्ती केली.

Explanation:

Similar questions