ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले कारणे लिहा
Answers
Answer:
३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.[१] अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.[२] तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्यावसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टार चा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले.
Answer:
1980च्या दरम्यान पंजाब मध्ये स्वतंत्र बनवण्यासाठी चळवळींना सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली जनरल सिंग यांनी सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली त्यांनी अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा सर्व घेतला त्यांचे अनुभव आहे सुवर्ण मंदिराचा परिसर चावे घेतले होते रेकी कारवाया केल्या असून मंदिराला किल्ल्याचे स्वरुप आले व शांतता धोक्यात आली सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला .