Science, asked by aimanmujawar94135, 9 months ago

पाणि वाचवा
उपाययोजना​

Answers

Answered by SGS126
0

Answer:

९०% महाराष्ट्र कायमस्वरुपी पाणी टंचाईच्या छायेत

नामवंत जलतज्ञ डॉ.फाल्कन मार्क (स्वित्झर्लंड) यांच्या मापदंडानुसार, दरडोई दरवर्षी १,७०० घ.मी. पेक्षा जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असणारा प्रदेश वैभवशाली समजला जातो. या मापदंडानुसार एखाद्या प्रदेशाला सुजलाम-सुफलाम बनवायचे असेल, तर दरडोई दरवर्षी १,००० ते १,७०० घनमीटर पाणी उपलब्ध असावे लागते. सदर पाणी उपलब्धता १,००० घनमीटर पेक्षा कमी प्रमाणांत असलेल्या प्रदेशाला पाणी टंचाईचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. दरडोई दरवर्षीची पाण्याची उपलब्धता ५०० घ.मी. एवढ्या प्रमाणात खालवल्यास सदर प्रदेश मानवी जीवनासाठी कठीण समजला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विचार करता राज्यातील वेगवेगळ्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे.

२००१ च्या जनगणेनुसार कोकण विभागाच्या २.४९ कोटी लोकसंख्येला ६९,२१० दलघमी म्हणजेच दरडोई दरवर्षी सुमारे २,७८० घनमीटरच्या आसपास पाणी उपलब्ध होते. या उलट गोदावरी, तापी, नर्मदा व कृष्णा या चार नदी खोर्‍यातील, वापरण्यासाठी मुभा असलेल्या ५६,२७६ दलघमी जलस्त्रोतांवर ७.२० कोटी लोकसंख्या अवलंबुन होती. म्हणजे या चार नधी खोर्‍यांच्या क्षेत्रात दरडोई दरवर्षी केवळ ७८८ घनमीटर एवढेच पाणी वापरासाठी उपलब्ध आहे.

सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता

कालव्यांची अर्धवट कामे, ऊसासारख्या पिकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सिंचनाचे पाणी, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकीकरण, सिंचन व्यवस्थेतून होणार्‍या पाण्याची गळती व चोरी, धरणांतील गाळसाठ्यामुळे कमी होत जाणारी सिंचन क्षमता, रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणार्‍या पाण्याचा होणारा अपव्यय, तसेच सिंचनाचे पाणी इतर क्षेत्राकडे वळविण्याचे वाढलेले प्रमाण इ. कारणांमुळे निर्माण करण्यात आलेल्या सिंचन क्षमतेचा अपेक्षित प्रमाणांत वापर होताना दिसत नाही. सदर परिस्थितीत बदल घडविण्यासाठी प्रत्येक सिंचन प्रकल्पाच्या आधारे निर्माण झालेली सिंचन क्षमता व वापरात येणारी सिंचन क्षमता याबाबतची प्रकल्पनिहाय अद्ययावत माहिती ठेवण्यात यावी. या पुढील काळात पाण्याची उपलब्धता तसेच जमिनीच्या स्वरुपावरुन पीक पध्दती निश्चित करण्याचे बंधन लाभक्षेत्रातील लहानमोठ्या शेतकर्‍यांवर घालावे लागणार आहे.

धरणांच्या पाणी साठ्यात वाढ -

राज्यात पावसाळ्यातील चार महिने भरपूर पाऊस पडतो. मात्र पावसाचे अडविण्याच्या पुरेशा सुविधा निर्माण न केल्याने पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते. यामुळे पावसाळ्यातील चार महिने सोडल्यास राज्यातील बहुतेक नद्या कोरड्या असतात. महाराष्ट्रात भारतातील सर्वात जास्त धरणे असली तरी, धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. राज्यात एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला की उर्वरित दोन तीन वर्षे पाणी टंचाईची असतात. चांगला पाऊस झालेल्या वर्षी धरणातील पाणी खाली सोडून द्यावे लागते यामुळे धरणाच्या खालच्या भागांत पुराची स्थिती निर्माण होते. सदर बाब टाळण्यासाठी राज्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यामुळे चांगला पाऊस असलेल्या वर्षी वाहुन जाणारे पाणी अडवून ठेवणे व टंचाईच्या वर्षात त्या पाण्याचा वापर करणे शक्य होऊ शकेल.

Explanation:

Similar questions