English, asked by harshpatait18, 5 hours ago

प्रसंग लेखन-10 वी निरोप समारंभ in marathi​

Answers

Answered by Sauron
169

उत्तर :

★ प्रसंग लेखन -

__________________________________

दिनांक - 22 फेब्रुवारीपासून आमच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार त्यामुळे शाळेमध्ये वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ 19 फेब्रुवारी रोजी आयोजित केला. संध्याकाळी 4:30 वाजता श्री शिवाजी विद्यालयातील वर्ग दहावीच्या सर्व तुकड्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आमच्या शाळेच्या मोठ्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांसाठी आकर्षक मनमोहक अशी रांगोळी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचा हॉल अतिशय सुंदर पद्धतीने सजविण्यात आला होता.

नियोजित वेळेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देत काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून सांगितल्या. मुख्याध्यापक सर त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीने बोलत होते. त्यांची कडक शिस्त बोलण्यात कुठे दिसून येत नव्हती. त्या वेळेस आम्हाला समजले की, कडक शिस्तीचे दिसणारे सर मुळात मृदु स्वभावाचे आहेत. अन्य शिक्षकांनीही आमचे कौतुक करत भविष्यासाठी मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या.

मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेच्या, शाळेतील सर्व शिक्षकांच्या बद्दल आभार व्यक्त केले. इच्छुक विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणी सांगत शिक्षकांचे आभार मानले.

काही विद्यार्थी दुसऱ्या गावी जाणार त्यामुळे त्यांनी आठवण सोबत असावी म्हणून ग्रुप फोटोज काढले.

कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एरवी प्रत्येक तुकड्यांमध्ये एक स्पर्धा दिसायची पण त्या दिवशी मात्र ही स्पर्धा विसरून सर्वजण या प्रसंगाचा आनंद घेताना दिसून येत होते. सर्व जण अतिशय भाऊक झालेले दिसून येत होते कारण ज्या शाळेने आपल्याला घडविले तिच्यापासून आता वेगळे व्हावे लागेल.

सर्व शिक्षकांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद घेऊन शाळेचा निरोप सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.

______________________________

Answered by sahiljawale2006
37

Answer:

दि. 20 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आमच्या ज्ञानसंवर्धन विद्यालयाचा 10वी च निरोप समारंभ होता. मी बरोबर 4 वाजता शाळेच्या हॉलवर हजर झाले. शाळेचा हॉल फुळे व फलकांनी सुंदर सजवला होता. मुख्याध्यापक व शिक्षक ज्या टेबलापाशी बसणार होते ते टेबल सुंदर फुलदाण्यांनी सजवले होते.

समारंभाला दुपारी 4 वाजता सुरुवात झाली. दहावीच्या समीर पाटील याने भावपूर्ण निरोपाचे भाषण दिले. ज्यामध्ये त्याने शाळेबरोबर  तसेच त्याच्या वर्गाबरोबर, मित्रांबरोबर असलेले संबंध नमूद केले शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका व शाळेतील सर्व कर्मचारीचे मनपूर्वक आभार मानले.त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी रविंद्र चव्हाण याने सुंदर भाषण करून गुरूबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्याने शाळा व शिक्षक यांचा आम्हां विद्यार्थ्याच्या व्यक्तिमहत्त्वात कसा बदल होता गेला याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्याच्या बोलण्याने आम्ही विद्यार्थी भावूक झालो; पण त्याने लगेचच विनोद निर्माण करून वातावरण हास्य बनवले

मुख्याध्यापिकानी आपल्या भाषणात भावी आयुष्यात वाटचाल काशी करावी यांचे मार्गदर्शन केले. देशभक्ती आणि राष्ट्रिमतेची भावना अंगी बाणवण्यावर जोर दिला. शेवटी वर्गशिक्षिका सौ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यानी केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. आम्हांला पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर साधारण एक तास आम्ही सर्व मित्र मैत्रिणी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाळेतील 1ली पासून ते 10पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक व शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणी सोंबत सेल्फी काढले.

उद्या पासून मी विभक्त होणार होतो या भावनेने मी दुःखी झालो होतो माझ्यासाठी, ती केवळ एक ज्ञान देणारी शाळा नव्हती तर संस्कृती व सभ्यतेचे उगमस्थान होते. सर्व शिक्षकांचे आशिर्वाद घेतले. मित्रांना शुभेच्छा दिल्या. आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी घेऊन मी जड अंतःकरनाणे शाळेच्या निरोप घेतला पण जेव्हा कधी शाळेची आठवण झाली की मी शाळेला नक्की भेट देईन.

Explanation:

Similar questions