Question 2
खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
ताव्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता, त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन
अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेस अन्नाची चव बिघडते, तर काही वेळेस अन्नपदार्थांच्या
रंगात बदल होतो. त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून ताव्याच्या आणि पितळेच्या
भांड्यांना आतून कल्हई केली जाते.
जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते. त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने
तापवले जाते. पांढऱ्या रंगाची नवसागराची (अमोनिअम क्लोराइड) भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने
घासून स्वच्छ, लख्ख केले जाते. हे करताना पांढरा, उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच
कधील (टिन) धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कधील हा मऊ, लकाकणारा, निळसर-पांढन्या
रंगाचा उपयुक्त धातू आहे. तो पटकन वितळतो. अतिशय कौशल्याने कल्हईवाला तो वितळलेला धातू पटकन
भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते. कल्हई केलेल्या
भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही, म्हणून दर काही महिन्यांनी ताब्या-पितळेच्या
भांड्यांना कल्हई करणे गरजेचे असते.
पन.
Answers
Answered by
2
Answer:
sorry I don't know this language can you answer this question in English
Answered by
0
Answer:ghrhrjrjjrjtjtjdjjdeueurujr ebbdbd dhhdbdhdbddh hdbd sch djdjd
Explanation:
Similar questions