India Languages, asked by pranavrajpure, 3 months ago

सारांशलेखन :

पुढील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश शब्दांत सारांश लिहा :

वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते, तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार?

राजा मंगळवेढेकर​

Answers

Answered by kumkumpari555
5

वेळेचे नियोजन करताना, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे कशी वापरायची, लिखित रेकॉर्डचे फायदे, विशिष्ट कार्य करण्यासाठी वेळ शोधणे, हाताळणी, विलंबावर मात करणे आणि बरेच काही ते कसे वापरावे हे ते स्पष्ट करतात.

Answered by bhaveshgiraserajput
0

Answer:

soryy i can,t answer i am a student

Similar questions