Hindi, asked by sakshidurva26, 26 days ago

स्वमत on वाचाल तर वाचाल​

Answers

Answered by jayantgandate
3

आज जीवन गतिमान झाले. कामे खूप झाली आणि वेळ कमी पडतो या सबबीखाली बरेच लोक साहित्याला पारखे झाले. वाचायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्यांच्या कडे वेळ आहे असे लोक सुध्दा वाचत नाहीत. वाचनाचा कंटाळा येतो म्हणून बरेच लोक वाचत नाहीत. पुस्तके ज्ञानरंजक असतात. परंतु ज्ञान व मनोरंजन करण्यासाठी पुस्तकाला पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे टि.व्ही., मोबाईल, इंटरनेटसह संगणक, चित्रपट गृह, पंच तारांकित होटल, पब्स, विविध क्लब्स इत्यादी. पुस्तकांची जागा वरील माध्यमांनी घेतली. त्यामुळे 'हल्ली वाचन संस्कृती उरली नाही' असे सर्वत्र ऐकायला येते.

वाचनालयापेक्षा थियेटर किंवा इंटरनेट कॅफे वर गर्दी असते. विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा टी.व्ही. वरील कार्टून शो किंवा रियालिटी शो चे आकर्षण वाटते. ऐन परिक्षेच्या काळात टी.व्ही. वर क्रिकेटच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण असते. अशा वेळेस विद्यार्थी तासनतास टी.व्ही. समोर बसून असतो. असे करुन तो स्वत:चेच नुकसान करीत असतो परंतु त्याला हे कळत नाही.

Similar questions