India Languages, asked by nupoor516, 5 months ago

शाळा बंद झाल्या तर...

मराठी निबंध.
Don't spam. If don't know then don't answer or else I will report it...​

Answers

Answered by sam44257
2

Answer:

please mark as brainliest answer

Explanation:

सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायदा अंमलात आला. मातृभाषेतून शिक्षण हा जर मुलांचा मुलभूत हक्क मानला, तर सगळ्यांना सामावून घेण्यासाठी नवीन मराठी शाळा सुरू कराव्या लागतील. पण शासन मात्र स्वतःच्याच राज्यात इंग्रजीसमोर पायघड्या घालून मराठीला सापत्नभावाची वागणूक देत आहे. अनुदान द्यावे लागू नये म्हणून मराठी शाळांना परवानगीच न देण्याचा निर्णय ६ वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता. मराठी जनतेने हे स्वीकारल्याचं पाहून शासनाने मराठी राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, अधिक उत्साहाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. १९ जून रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकांत, परवानगीसाठी रितसर अर्ज करूनही, शासनाच्या मराठी विरोधी धोरणामुळे बेकायदेशीर ठरलेल्या, पण प्रत्यक्षांत आजही सुरु असलेल्या मराठी शाळा तात्काळ बंद करण्यांस फर्मावले आहे. असे न केल्यास प्रथम १ लाख व नंतर दिवसाला १० हजार रू. दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. शासनाच्या या धमकीच्या धोरणापायी पुण्याच्या ग. रा. पालकर प्रशाला या मराठी शाळेचा अपमृत्यू झाला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडलेला टाहो १६ ऑगस्ट्च्या लोकसत्तेत छापून आला होता.

मराठी शाळांना परवानगी दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडेल असं कारण शासन वारंवार देत आहे. पण मग शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता चालवण्यात येणार्‍या नाशिकच्या आनंद निकेतनसारख्या प्रयोगशील शाळांना परवानगी मिळत नाही.

...पण या काळांत ११९० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाने परवानगी दिलेली आहे.

या धोरणात्मक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्र्यांचं जगभरातील मराठी जनांतर्फे हार्दिक अभिनंदन.

Similar questions