English, asked by shraddakopoor4656, 9 months ago

Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi ||सूर्यउगवलानाहीतरNibandh

Answers

Answered by fistshelter
5

Answer: जर सूर्य उगवलाच नाही तर या पृथ्वीवर जीवन धोक्यात येईल कारण सूर्य आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा देणारे 'ड' जीवनसत्त्व प्रदान करतो आणि त्यामुळे आपण जगू शकतो. म्हणून हे जीवनसत्त्व आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे.

जर सूर्य उगवला नाही तर आपल्याला अन्नासाठी काहीही उपलब्ध होणार नाही आणि आपण जगू शकणार नाही. कारण केवळ सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या सभोवतालची झाडे त्यांचे अन्न बनवतात आणि त्यामुळे आपल्याला अन्न मिळते.

सूर्य हा जलचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो उगवला नाही तर जलचक्र बिघडून जाईल. सूर्य उगवला नाही तर सकाळ आणि संध्याकाळ या शब्दांना अर्थ राहणार नाही. पूर्ण जग अंधारात बुडून जाईल.

सूर्य उगवला नाही तर प्रकाश म्हणजे नक्की काय हे आपल्याला कधीच समजलं नसतं. आपण एकमेकांना पाहू शकलो नसतो. सूर्य नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्वच नसते.

Explanation:

Similar questions