India Languages, asked by bhosledimple, 2 months ago

टीही
पाहण्यापेक्षा ते आटीक उत्तम आहे (पश्रार्थि करा)​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन 2016-17) एकच सामायिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी होणार आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे.

या प्रवेशासाठी पूर्वी जेईई ५० टक्के आणि राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेतील ५० टक्के गुण मिळाले की विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत असत. परंतु शासनाचा नव्या निर्णयामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावरील आधारित ‘सीईटी’ मध्ये ५० टक्के आणि बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये ५० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. यात वैदयकीय प्रवेशासाठी जीवशास्त्रामध्ये ५० टक्के गुण असणाऱ्यांनाच आता प्रवेश मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाचे महत्त्व निश्‍चितच वाढले आहे. ही परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने या विद्यार्थ्यांनी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. त्यामुळे साहजिकच राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर एकच सीईटी असल्याने विद्यार्थ्यांना पर्यायांची उपलब्धता सहज सोपी झाली आहे.

निर्णयाची वैशिष्ट्ये

राज्यातील विविध अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी (MHT- CET) ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून घेण्यात येणार आहे.

सदर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेकरिता विदयार्थी एकच प्रवेश परीक्षा अर्ज सादर करतील.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र (प्रत्येकी 50 गुण) या दोन्हींची प्रश्नपत्रिका सामाईक असेल. तर गणित (100 गुण) व जीवशास्त्र (100 गुण) या विषयांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील.

राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ही राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर असेल.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता व गुणवत्ता

here is your answer...

hopes it helps you...

Answered by Anonymous
1

Answer:

टी. व्हि.पाहन्यापेक्षा काय् महत्वाच आहे?

Similar questions