History, asked by devidasparbate, 1 month ago

तुमचे मत लिहा.
(१) भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही
कोणते उपाय सुचवाल?​

Answers

Answered by pranavbhoir5
4

Answer:

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती नेहमीच तणावपूर्ण राहिली असून दहशतखोर हल्ल्यांद्वारे छुप्या युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच्या गेल्या अडीच तीन दशकांत ती सातत्याने हिंसाचार आणि असंतोषाने धुमसते आहे. पाकिस्तानच्या सक्रिय पाठिंब्याने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना जिहादच्या नावाने घुसवून, प्राणहानी आणि वित्तहानी घडवून, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करून भारतापासून त्याला दूर नेण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यामागे आहे. तथापि, गेल्या महिनाभरात आणि आता गेल्या आठवडाभरातील दहशतवादी कारवायांसोबतच सीमेवरील पाकिस्तानी सैन्याकडून होणारी आगळीक अत्यंत हीन पातळीवर गेली आहे.

Similar questions