Hindi, asked by trideviya, 8 months ago

व्यक्तिमत्व विकासात असलेले छंदाचे महत्व लिहा​

Answers

Answered by ammumisty
10

Answer:

व्यक्तीचा शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तिचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्वाबाबत विशेष माहिती स्पष्ट होण्यासाठी पुढे काही व्याख्या दिल्या आहेत –

व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना होय.

व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळा बेरीज होय.

व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक उद्दीपन मुल्य.

व्यक्तिमत्वाचा विकास : शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी तिला आनुवंशिकतेने मिळालेल्या असतात. व्यक्तीकडे असलेल्या उपजत अशा बाबींना जैविक बीजे म्हणता येईल. जीवन जगत असतांना विविध बाह्य घटकांचा, प्रामुख्याने सामाजिक घटकांचा, व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. जैविक बीजे आणि बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय. अर्थात व्यक्तिमत्व विकासात आनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हीशी संबंधीत घटकांचा वाटा असतो. व्यक्तिमत्व विकासात वाटा असणारे काही घटक पुढीलप्रमाणे –

शरीरचना : काही व्यक्तींना उंच धिप्पाड तर काहींना बुटके शरीर लाभलेले असते, काही व्यक्तींचे शरीर सुडौल आणि व्यंगरहीत असते तर काहींच्या ठिकाणी शारिरीक व्यंगे असतात. व्यक्तीच्या शरीररचेनाचा तिच्या समायोजनावर चांगला अथवा वाईट परिणाम होतो. उत्तम शरीरयष्टी व आकर्षक चेहरा असणाऱ्या व्यक्तींचा चेहरा इतरांवर लवकर प्रभाव पडतो. उत्तम शरीरसंपत्तीच्या बळावर व्यक्ती नेता बनू शकतो.

Answered by preetykumar6666
12

व्यक्तिमत्व विकासात छंदांचे महत्त्व:

आजच्या स्पर्धात्मक जगातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रतिभावान आणि आत्मविश्वासू मुलाची स्वप्ने पाहतात. मुलामध्ये एक विशिष्ट व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, पालकांनी त्यांना अर्थपूर्ण छंदात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे, छंद विद्यार्थी जीवनातील सांसारिक गोष्टी पार पाडण्याच्या कंटाळवाण्यापासून तारणहार होऊ शकतो.

मुलाच्या सतत विकसनशील आणि जिज्ञासू मनात गुंतण्याचा छंद हा एक उत्तम मार्ग आहे. मग ते वाचन, कादंबर्‍या, बागकाम, चित्रकला, संगीत, कथा आणि कविता लिहिणे किंवा नृत्य असो - पालकांना मुलांमध्ये छंद लावण्यास प्रवृत्त केले पाहिजे. या क्रियाकलापांमुळे त्यांचे संवाद आणि सामाजिक कौशल्येच बळकट होत नाहीत तर एखाद्या व्यक्तीची छुपी प्रतिभा देखील समोर येते.

Hope it helped...

Similar questions