English, asked by deepikagupta12135, 1 month ago

fal uthpadan in marathi.​

Answers

Answered by babyboy11
0

Answer:

It might seem complicated, but the answer is actually very simple. Use “to” when the reason or purpose is a verb. Use “for” when the reason or purpose is a noun. That's all

Answered by mayankjangde08
4

Answer:

महाराष्ट्रात फळझाडांची नियोजनबद्ध लागवड फार पूर्वीपासून होत असून आज देशातील फळझाडांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जात आहे.कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्या जमिनीत देखील काही फळझाडाची लागवड फायदेशीर होऊ शकते. फळपिकांच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडाची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे असते.उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे झाले नाही तर मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी? या विषयीचे विवेचन प्रस्तुत लेखात केले आहे.

डाळिंब

डाळींब पिकाला कोरडवाहू फळपिकांच्या शेतीत प्रथम स्थान आहे. महत्वाचे असते. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी महिन्यात-२३ लिटर, मार्च महिन्यात- ३४ लिटर, एप्रिल महिन्यात- ४६ लिटर तर मे महिन्यात- ५0 लिटर पाणी प्रती झाडास दररोज देणे आवश्यक असते. पाणी देण्यात जर अनियमितता आली तर फुलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पाण्याची टंचाई असणा-या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. सेंद्रिय खतांचा वापर जास्तीतजास्त केल्यास जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेत देखील वाढ होते. ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दंडाने ७ ते ८ दिवसांनी पाणी पुरवठा करावा. तसेच झाडाच्या वयोमानानुसार एका झाडावर फळाची संख्या ठेवावी, जेणेकरून फळाचा आकार व वजन चांगल्या प्रकारे मिळेल व फळांना बाजारभाव चांगले

Similar questions