India Languages, asked by fouzsami2709, 9 months ago

Marathi Essay Environment

Answers

Answered by jyotsna19
0

फाल्गुन सुरु होऊन आता दहा दिवस होत आलेत. दोन दिवसांपासून हवेत वेगळाच ओलावा जाणवतोय. आज सकाळी वेळ साडे सातची! आमची शाळा आणि गावात जाण्याचा मुख्य रस्ता अगदीच जवळ जवळ. फक्त मध्ये एक चारी. शाळा इतकी जवळ की

झाडाझुडपांमुळे न दिसणारी! शाळेच्या गेटमधून एकदा का आत प्रवेश केला की एखाद्या अनोख्या दुनियेत प्रवेश मिळतो. एक अनोखे जग! विविध जिवंत अनुभव जिथे सतत चैतन्य घेऊन इकडून तिकडे फिरत असतात. शाळेच्या त्या इवल्याशा ग्राउंडवरच्या मातीत काय जादू आहे माहित नाही पण त्या मातीवर पाय ठेवल्या ठेवल्या मनातली सगळी किल्मिषे गाळून पडतात. अन मन एका वेगळ्याच भावनेने भरून जाते. आई आणि वडील दोन्हीही कामावर जातात म्हणून लवकर येऊन बसलेले ते भोळेभाबडे जीव जेव्हा आपल्याला पाहून "मॅडम आल्या, मॅडम आल्या " असं म्हणून सुसाट आपल्या दिशेने पळत सुटतात तेव्हा देवा शप्पथ सांगते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्या क्षणी फक्त मी आणि मीच असते. इतका आनंद होतो ते दृश्य पाहून कि त्याचा वर्णन करणं कठीण आहे. अशीच आजची एक रम्य सकाळ! वेळ साडे सातची! गाडीतून खाली उतरल्या उतरल्या दुसरीचा यश धावत धावत आला आणि मी श्वास घेण्याच्या आधीच हातातली काहीतरी वस्तू दाखवत म्हणाला," मॅडम मॅडम हे पहा, हे तुमच्यासाठी आणलय. नितीनने तयार केलाय ते" काय असेल ते ? gess......हिरव्या हिरव्या पानांची बनवलेली एक सुरेख पर्स! चिमणीच्या हातात शोभून दिसेल इतकी ती छोटीशी! "मॅडम घ्या ना! तुमच्यासाठीच आहे." किती सुंदर अनुभूती! किती अद्भुत जग त्या छोट्यांचे! मी खूपच कुतूहलाने ती हातात घेतली आणि सहज म्हटलं "काय ठेऊ रे यात?" क्षणाचाही विलंब न लावता यश म्हणाला," जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते ठेवा." त्याच्या त्या उत्तराने आणखीनच भारावून गेले. आणि खोल विचारात गढून गेले.....खरंच काय आवडतं आपल्याला सर्वांत जास्त!

Answered by vikram991
3

Explanation:

आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते;

निसर्गाशी जवळीक साधणे नेहमीच चांगले असते;

आपल्या देशात होत असलेल्या औद्योगिक व इतर विकासाच्या वेगवान गतीमुळे त्याचे नुकसान झाले आहे;

वाढती लोकसंख्या हीच आपल्या वातावरणावर ओझे आणत आहे;

प्रत्येकाला जगण्यासाठी आणि जगण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जंगले साफ केली जात आहेत;

जरी तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यास सुलभ केल्यामुळे आम्हाला मिळणा या फायद्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही;

आम्ही खेड्यांमध्ये साधे जीवन जगण्यास परत जाऊ शकत नाही, परंतु आपण यावर कशावर अवलंबून आहोत की आपण चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग कसा करतो आणि गैरवापर टाळता येतो;

आम्ही कमी सेवन करून आणि आपल्याकडे असलेले वस्तू पुन्हा वापरुन फरक पडू शकतो;

दुर्मिळ आणि नूतनीकरणयोग्य संसाधने योग्य आणि बुद्धीने वापरली पाहिजेत.

Similar questions